Breaking News
नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसापासून कोरोना च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली च्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून दिल्लीत येणाऱ्या लोकांना आता त्यांचा कोरोना निगेटिव्ह असलेला अहवाल सादर करावा लागणार आहे.
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आता त्यांची RT-PCR चाचणी सादर करावी लागणार आहे. या अहवालाशिवाय संबंधित पाच राज्यांच्या नागरिकांना दिल्लीत प्रवेश करता येणार नाही.
दिल्ली सरकारने या पाच राज्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना किमान 72 तासापूर्वीचा RT-PCR सादर करावा लागणार आहे.
रिपोर्टर