नवी मुंबईत दिवा - बत्ती घोटाळा? टक्केवारीचा पाळणा लावून आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध
- by Santosh Jadhav
- Feb 11, 2023
नवी मुंबईत दिवा - बत्ती घोटाळा? टक्केवारीचा पाळणा लावून आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध
नवी मुंबईत फक्त एलईडी दिवा बदलण्यासाठी, पूर्ण खांब बदलले
नवी मुंबई : आम आदमी पक्षाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेकडून, नको त्या नागरी सुविधांवर, वेळोवेळी होणाऱ्या वायफळ खर्च बद्दल आणि आपच्या दिल्ली सरकारच्या धर्तीवर, पत्येक नागरी सुविधा कामाची मंजुरी, त्या त्या प्रभागातील सामान्य नागरिकांचे मत घेऊन, त्या कामाचे सोशल ऑडिट घेऊन मगच झाली पाहिजे असे निवेदन वेळोवेळी पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
नको असलेली रस्ते - फुटपाथ दुरुस्ती, रंगरंगोटी, जाहिरातबाजी इत्यादी गोष्टींमध्ये भर म्हणून कि काय, सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशांमधून करण्यात आलेला करोडोचा कोपरखैरणे येथील एक नवीन दिवा - बत्ती घोटाळा उघडकीस आलेला आहे. यामध्ये हॅलोजन दिव्या ऐवजी, एलईडी दिवे बदलण्यासाठी, आधीच सुस्थितीतील खांब वापरण्या ऐवजी, पूर्ण खांब आणि केबलिंग नवीन टाकण्याचा वायफळ खर्च करण्यात आला आहे. आप नवी मुंबईकडून कोपरखैरणे येथे अश्याच एका डबल दिवाबत्ती खांबाच्या जागेवर जाऊन, त्या खांबांना कंत्राटदारांच्या टक्केवारीचा पाळणा बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. ह्या घोटाळ्या बद्दल मुख्य मुद्दे खालील प्रमाणे
१) एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब बदलण्याआधी तटस्थ यंत्रणेमार्फत स्ट्रक्चर ऑडिट केले गेले होते का?
२) जुने खांब विकले असते तर त्यातून किती रक्कम प्राप्त झाली?
३) वीज बचतीसाठी सोडियम पेपर लावण्याचा प्रामाणिक हेतू असेल तर अनेक ठिकाणी एका कामावर चार एलईडी दिवे लावणे मागचे प्रयोजन काय? ( दस्तुरखुद्द आयुक्त निवास समोरील रोडवर ४ दिवे लावलेले आहेत)
४) वीज बचतीच्या नावाखाली एलईडी लाईट बसवले असले तरी शहरातील अनेक भागांमध्ये सूर्यस्थापूर्वी आणि सूर्योदयानंतर विजेचे खांबावरील बल्ब सूर्याच्या प्रकाशाची स्पर्धा करताना का दिसतात ?
५) पालिकेने विजेच्या खांबावरील बल्ब सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार चालू बंद होण्यासाठी लाखो रुपयांचे कंत्राट दिलेले आहे असे असताना अवेळी दिवे चालू का असतात? फोटो सेन्सिटिव्ह यंत्रणा कार्यान्वित नसताना त्याची बिले अदा कशी केली जातात?
६) पालिका प्रशासनाचा हाय मास घोटाळ्यावर देखील प्रकाश टाकण्याची गरज आहे. अनावश्यक पद्धतीने नगरसेवकांनी मनमानी पद्धतीने आपले निवास कार्यालय समोर हाय मस्त बसून घेतलेल्या आहेत. हाय मस्त शेजारील पथदिवे देखील अनेक ठिकाणी सुरू असतात.
७) गेल्या दहा वर्षात हाय मस्ट निर्मिती व देखभाल यावर किती खर्च केला याची देखील चर्चा व्हायला हवी.
८) नवीन पथदिवे बसवताना निर्माण केलेल्या बेसमेंट मध्ये योग्य दर्जाचे सिमेंट आहे का? अनेक ठिकाणी दर्जाहीन कामे झाल्याचे दिसतात.
९) नवीन खांबांना विजेचा सप्लाय करण्यासाठी केलेली केबलिंग चक्क डिवायडर खोदून केलेली आहे.
अनेक ठिकाणी चांगल्या रस्ता खोदून केबल फिरवलेल्या दिसतात. केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अजूनही तसेच आहेत. ह्या टक्केवारीच्या पाळणा आंदोलनात आम आदमी पक्षाचे श्यामभाऊ कदम - कार्यकारी अध्यक्ष, देवराम सूर्यवंशी - अध्यक्ष - ऐरोली विधानसभा क्षेत्र, नीना जोहरी- जिल्हा सहसचिव, धनवंती बच्चन - वॉर्ड अध्यक्ष, तसेच किरण कुंदारे, छगन पटेल आणि कपिलदेव शर्मा इत्यादी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav