मुख्य माहिती आयुक्त यांच्या चर्चेनंतर अण्णाजी हजारे यांचे उपोषण स्थगित
- by Santosh Jadhav
- Jun 22, 2026
मुख्य माहिती आयुक्त यांच्या चर्चेनंतर अण्णाजी हजारे यांचे उपोषण स्थगित
माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र सध्या अधिकारी मालकासारखे वागत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक प्राथमिक चर्चेनंतर अण्णांनी ५ तारखेचे नियोजित आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. परवा होणाऱ्या पुढील महत्त्वपूर्ण बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला असून या बैठकीवरच आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले...
अण्णा हजारे का उपोषण करणार होते?
माहिती अधिकार अतंर्गत माहिती मागवताना आता राज्य सरकारने नवे निकष लागू केले आहेत. या निकषांविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या नव्या नियमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे नवे नियम माहितीचा अधिकार कमकुवत करणारे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असल्याचा थेट आरोप अण्णांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून हे जाचक नियम तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. नव्या नियमावलीतील तरतुदींवर अण्णा हजारे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. माहिती मागवण्यासाठी करण्यात आलेली भरमसाठ शुल्कवाढ, अर्जदाराला ओळखपत्राची केलेली सक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "एक विषय-एक अर्ज" ही नवी अट, यांमुळे सर्वसामान्यांना माहिती मिळवणे अत्यंत कठीण होणार आहे. ही एकप्रकारे माहिती अधिकार कायद्याची गळचेपी असून, पारदर्शकता संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा अण्णांनी पत्रात केला आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav