Breaking News
३१ जुलै पर्यत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा
३१ जुलै पर्यत सरकार एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. त्याचबरोबर मला या राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना हे सांगायचं आहे कि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि सगळी भरती तातडीने करण्यासाठी आग्रही असताना सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिल्याने न्यायव्यवस्थेचा आदेश सर्वाना मान्य करावा लागतो आणि तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका राज्य सरकारची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं
ते पुढे म्हणाले, स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबद सरकार सकारात्मक भूमिका घेईल तसेच सरकार कोणाचेही असलं तरी अशी घटना घडत काम नये असेही अजित पवार यांनी म्हंटल . आम्हीदेखील लोणकर कुटुंबियांच्या दुखत सहभागी असून पुन्हा राज्यातील कोणत्याही मुलावर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी सरकार नक्कीच घेईन अशी खात्री अजित पवार यांनी दिली.
रिपोर्टर